Tuesday, December 08, 2009

तुला विसरणं ...

तुला विसरणं हा
तुला आठवनयाचाच एक बहाणा आहे,
नकोसा आणि केविलवाणा !!!

तुला विसऱ्ण्या इतक
मी तुला आठवलाच नव्हत
फक्त साठवलं होत प्रत्येक श्वासात !!!

तुझी प्रत्येक गोष्ट
मी अगदी डोक्यातून काढून टाकलीय
फक्त मनात रुतून बसलीय
एक्यादया निर्गाठीसारखी !!!

तुझ्याविनाही आयुष्य सुरूच आहे
फक्त माझ 'मी' पण परत दे

जे तुझ्यासोबत आहे.... निरंतरपणे !!!

Friday, November 27, 2009

तो तिला म्हणाला .....

तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे"

ती म्हणाली "पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे"


तो म्हणाला "काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर॥"

ती म्हणाली " आई रागावतील, दूध उतू गेल तर॥"


"ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ"

"पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ"


"बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू"

"नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू"


"तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट"

"बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट"


आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस

एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस


सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून

डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून


दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना

सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना


नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली

अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।


तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला

"रागावलास माझ्यावर?" आणि तो विरघळला।


"थोडासा..." त्याने सुद्धा कबूल केला आपला राग

ती म्हणाली "बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग"


"माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल

छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल..

अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस,

सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस...

तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं

झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?"


"बोललास हेच पुरे झाल...एकच फ़क्त विसरलास ...

माप ओलांडून आले होते, "मी-तू" पण तेव्हाच गळलं

माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं?"


Tuesday, November 24, 2009

फक्त तू नकोस मला....

फक्त तू नकोस मला
साथही तुझी हवी आहे
शांत स्थळी एकांतवेळी
प्रीत तुझी हवी आहे

शृंगार प्रेम नको मला
वात्सल्य प्रेम हव आहे
सांजवेळी सूर्यास्ताला
प्रेमगीत हव आहे

दवबिंदू नकोत मला
रिमझिम पाऊस हवा आहे
रानफुलाला सुखावणारा
गार वारा हवा आहे

फक्त शब्द नकोत मला
अर्थ त्यातला हवा आहे
तिमिरातून तेजाकडचा
मार्ग त्यातून हवा आहे

सृष्टी सारी नको मला
द्रुष्टी तुझी हवी आहे
तुझ्या डोळ्यात दिसणारा
विश्वास मला हवा आहे

तुझा दुरावा नको मला
सहवास तुझा हवा आहे
खचनाऱ्या माझ्या मनाला
आधार तुझा हवा आहे

क्षण तुझे नकोत मला
प्रत्येक क्षणी तू हवी आहेस
वेळ तुझी नको मला
वेळीस तू हवी आहेस

का कोण जाणे?..........


आज जरा ऑफीस लवकरच सुटल्या सारखे वाटले,
चौपाटीवर गेलो तर तिथेही रोज सारखी गर्दी वाटत नव्हती
का कोण जाणे?..........

वाटले मारावा फेरफटका ह्या टोकापासून त्या टोककडे ,
पण फेरफटका मारताना आज पाय मात्र अडखळत नव्हते
का कोण जाणे?..........

रोज चालताना पायात घुटमळणारे पाणी,
आज मात्र आहोटीचे कारण सांगून खूप दूर गेल्यासारखे वाटले
का कोण जाणे?..........

मावशी कडचा भुत्टा आज बेचव लागत होता,
आणि एक गोळा एकट्याने संपतच नव्हता
का कोण जाणे?..........

वाटले बसावे एके ठिकाणी वाळूशी खेळत,
पण वाळू देखील वेळेसारखी पुढे सरकतच नव्हती
का कोण जाणे?..........

आज चौपाटीवर पाऊस जास्त नव्हता,
पण मन भरून आले होते
का कोण जाणे?..........

पावसाचे थेंब चेहर्यावर झेलत होतो,
जणू हजारो हात चेहर्यावरून फिरत होते
आसवे पुसायला???? ...की ...वाढवायला????
का कोण जाणे?..........

Saturday, June 06, 2009

मैत्री चार दिवसांचीच


मैत्री चार दिवसांचीच
हेच पटवलंयस मला
चार क्षणांचं भॆटणं
आता नकोसं झालंय तुला


अनंत काळचा विरह
चालणार आहे तुला
का का आज असा झालास
मैत्रीचं बंधनही
बंधन वाटू लागलं तुला ?


का नाही कळत तुला
मैत्री तर खूप छान भेट असते रे
तेच तर हक्काचं माहेर असतं
पहिली पायरी असते
पाय पसरून विसावण्याची...


का नाही उमगत तुला ???
ते प्राजक्ताचं फ़ूल नसतं
रात्री उमलून सकाळी बावणारं...
मैत्री तर सूर्यफ़ूल
तुला पहाताच रसरसून फ़ुलणारं


मग का ???
काय झालंय असं
की आपण असे वेगळे झालोत ???
का असं झालंय
की हातात हात घेऊन चालताना
आज तुला 'तू' आठवायला लागलं


का असं झालं
एक मन असूनही आपण वेगळे झालोत ???
का आज तू माझ्यासोबत नाहीस...
मला जवळ घ्यायला ???
का आज तू नाहीस
माझ्यावर रागवायला
माझ्याशी भांडायला ???


का आज जाणवतंय
कि एकत्र चालणारे आपण समांतर चालतोय
बस चालतोय...
तूही
अन मीही
माहित आहे तुला ???
समांतर रेषा कधीच एक होत नसतात रे
तसंच काहीसं आता तुझं नी माझं

Friday, January 16, 2009

सहज सांगता आलं तर...

हे सहज सांगता आलं तर.................!!!

वाटणारी प्रत्येक गोष्ट
शब्दांत मांडता आली तर...
मनातली प्रत्येक भावना
बोलुन दाखवता आली तर...
तुझ्यावर प्रेम आहे,
हे सहज सांगता आलं तर..

तुझ्याशिवाय जगुच शकत नाही,
हे पटवुन देता आलं तर...
तुझी खुप आठवण येते
हे विसरुन जाता अलं तर....

तुझ्या पलिकडे सुध्दा आहे
हे जाणुन घेता आलं तर...
माझं सुध्दा अस्तित्व आहे,
हे समजुन घेता आलं तर...

तु फक्त माझीच आहेस,
हे तुला न सांगता कळलं तर..
तु अशिच जवळ रहा,
हे स्पर्शानं सांगता आलं तर...
तु जवळ नसतेस तेंव्हा,
तुझा स्पर्श जाणता आला तर..
किती बरं होईल,
जर मन वाचता अलं तर...

शब्दांपलिकडलं काहीतरी
नजरेनच जाणता आलं तर...
हे सगळेच "तर" नाहीसे होतील
एकदाच म्हणालीस जर...
"मी सुखी होईन,
जर तु माझाच झालास तर..!" 


Ase kadhi Bolshil ka tu mala ...??

खरेच.. तुझ्या मनात काय आहे ???


खरे सांग ना रे तुझ्या मनात काय आहे ! 
रात्रीत दडलेली पहाट आहे की 
मुठीत दडविलेली इवलिशी अत्तराची कुपी आहे 
सांग ना रे मनात काय आहे............
मी म्हणाले हो तर तू नाही म्हणतोस 
मी नाही म्हंटले की तू हो म्हणतोस
आपले एकाच गोष्टीवर एकमत केव्हा होणार आहे 
सांग ना रे मनात तुझ्या काय आहे............ 
एकदा म्हणतोस तू माझी सर्वात चांगली 
मैत्रिण आहेस 
एकदा असे म्हणतोस की माला अशी हवी जिच्याशी 
साता जन्माच्या गाठी बांधेन 
सांग ना रे तुझ्या मनात काय आहे.............
कधी माझ्याकडे पाहून गोड हसतोस 
तर कधी लटक्या रागाने पहातोस
सांग ना रे आशा वेळी तुझ्या मनात काय नक्की काय असतं.....
राग तर तुझ्या कायम नाकावर असतो 
अणि गंमत म्हणजे हसुही कायम ओठावर असतं 
पटकन चिडून रागवल्यावर sorry पण लगेच म्हणायचे असतं
सांग ना रे आशा वेळी तुला नक्की काय म्हणायचे असते....... 
सांग ना रे तुझ्या मनात आशा वेळी काय असतं.....

आठवते तुला ती पहीली भेट

आठवते तुला ती पहीली भेट
माझ्या सारखंचं तुझंही झालं होतं
नेमकं काय बोलायचं
एक अनामिक ओझंही आलं होतं

आठवते तुला ती पहीली भेट
तुझ्या डोळ्यात रहस्य दडलेलं
सात जन्माचं नातं
मी पहील्या नजरेतचं अनूभवलेलं

आठवते तुला ती पहीली भेट
भावनांच्या चांदण्याने भरलेली
एका चंद्राने अलगद एका
चांदनीला मिठीत धरलेली

आठवते तुला ती पहीली भेट
भावनांनी कशी गर्दी केलेली
गर्दीत हरवताना कळलचं नव्हतं
रात्र कुठे अर्धी गेलेली

आठवते तुला ती पहीली भेट
किती हायसं वाटलेलं भावनांना
कवटाळलं होतं एकमेकांच्या
विचारांनी विचारांना

आठवते तुला ती पहीली भेट
मुक्या भावनांचं एक तळ साचलं होतं
दोघही तसे अज्ञानच होतो, तरीही
एकमेकांच अंतर्मन वाचलं होतं