Monday, December 08, 2008

स्वप्नांत तुझ्या जरूर येईन, पण
कधीच स्वप्नं दाखवणार नाही
तुला घेऊन भरारी घेईन, याहून
अधीक पंख फाकवणार नाही

चंद्र, तारे चरणी वाहीन, असं
कधीच वचन देणार नाही
अशक्यातलं "अ" काढलं म्हणून
अशक्य शक्य होणार नाही

अंथ्रुना बाहेर जातील असं
पायांना पसरवणार नाही
शेवटी मध्यमवर्गीय आहे
हे कधीच विसरणार नाही

समाधानाच्या पुढे कधीच
इच्छेची गती ठेवणार नाही
चारबाय आठच्या खोलीत
राजवाड्याचा दरवाजा मावणार नाही

माझ्यापाशी प्रेम व काळजी
ह्या गोष्टींची कोणतीच सीमा नाही
अगणित हृदय शोधून बघ
इतकं प्रमाण कुठेच जमा नाही

हे सारं तुला मान्य असेल, तर
आहे त्या स्थितीत स्विकार कर
फक्तं माझचं स्वप्न पाहीलं असशील
तर, निसंकोच ते साकार कर

काय हरकत आहे

आहे माझं प्रेम तुझ्यावर
जीव ओवाळते ना मी
वाट पाहते तुझ्या येण्याची
काय हरकत आहे....?

तुझं हसणं बोलणं वावरणं
आवडतं मला
तुझं निखळ स्वच्छ वागणं 
मोहवितं मला
काय हरकत आहे...?

हो, मी पाहते स्वप्न
तुझ्या माझ्या स्वप्नांची
तू रंग भरावेस असंही वाट्त मला
काय हरकत आहे...?

माझी स्वप्न माझी आहेत
माझे रंग माझे आहेत
माझं प्रेम माझं आहे
मग काय हरकत आहे?

माझी तुझ्यावर बंधन नाहीत
तुला "तशी" स्पंदनं ही नाही
तुला माझा त्रास ही नाही
की मझ्या प्रेमाचा जाच ही नाही
तरी..

तू प्रेम केल नाही 
तरी मी प्रेम करते ना
कुणासमोर नाही तरी
आतल्या आत झुरते ना
काय हरकत आहे?......

हरकत असून तरी काय होणार आहे?
बंधन घातलीत मनाला
तरी किती पाळल्या जाणार आहेत?
मग का बंधून ठेवायच?
प्रेम करणारच ना बांधुन देखील
मग मुक्त पणे करायचं
काय हरकत आहे

Sunday, December 07, 2008

बा हळव्या मना

एखादी गोष्ट मनाला लागते
म्हणजे नक्की काय होतं ?
द्रुष्टी देखल्या सत्याचा स्वीकार करणं
मन नाकारीत रहातं; असंच ना ?

वेड्या मनाला समजत नाही
की आभाळी रणरणत्या सूर्याला
हट्टानं चांदोबाच म्हणून
कुणी त्या ' चांदण्या ' त भटकू गेलं
तरी घाम निथळल्यावाचून का राहील ?

अश्रू म्हणजे तरी काय ?
सत्यसूर्याच्या दर्शनतेजानं
मनातून निथळणारा घामच की !

खोट्या कल्पनांत रमून
सत्य नाकारण्यापरीस
वेळीच त्याचा स्वीकार केला
तर निदान जखमेवर
औषध तरी शोधता येतं.....
सेप्टीक होण्यापूर्वीच !

अंगणांतला भक्कम वृक्ष
डोळ्यादेखत वठला
म्हणून अश्रू गाळत रहायचं
अन्‌ आसपास अंकुरणार्‍या
कोवळ्या रोपांना अव्हेरत रहायचं......
मग तीही सुकून गेल्यावर
अधिकच कष्टी व्हायचं
यात काय अर्थ?

खुळ्या माणसा,
दोन्ही डोळे उघडे ठेवून
जग पहायला शीक !

अरे, अंधारातून प्रकाशात येताना
आधी डोळे दिपणारच !
पण म्हणून, भेकड बनून
कायमचे का मिटून घ्यायचे असतात ते ?

Thursday, November 20, 2008

प्रेम व्यक्त करत नाहीस


प्रेम व्यक्त करत नाहीस
नुसते सुचक बोलत राहतेस
पण प्रेम व्यक्त करत नाहीस
मी बोलायची वाट पाहतेस
स्वता काही बोलत नाहीस

माझ्यावर प्रेम करतेस तर
सान्गत का नाहीस एकदा मला
माझ मन जाणतेस तरी
कसली भीती वाटते तुला

sms अगदी प्रेमळ लिहीतेस
आणि म्हणतेस फ़क्त मेत्री आहे
पण खर काही वेगळच आहे
याची मला पुर्ण खात्री आहे

आता सोड ना हे लाजण तुझ
अन हाक दे माझ्या प्रेमाला
मनातले शब्द मनातच ठेवतेस
का छळतेस अशी सान्ग मला...

Sunday, October 19, 2008

कमी आहे ती फक्त तुझ्या परत येण्याची


किती वेळ मी तुझी अशी वाट पहायची ?
तुझ्या आठवणीत ही सारी रात्र जागवायची, 
त्या चन्द्र चाँदन्याही मला वाट पहाताना बघतात,
तुझ्या नावाने मला पान फूल सुद्धा चिडवतात.

दिवस रात्र मी तुझाच विचार करत असते,
तू कसा आहेस? चन्द्र चाँदन्यानाच विचारत असते, 

कंटाळले आता तेहि प्रश्नांची उत्तरे द्यायला,
त्यानिही सुरुवात केली तूझी वाट पहायला.
कमी आहे ती फक्त तुझ्या परत येण्याची,

कदाचीत मलाच तुझी गरज असेल

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं
तर मला हाक मार
मी वचन तर देत नाही की.....
मी तुला हासवेन
पण मी तुझ्यासंगे रडू तर शकतो

एखाद्या दिवशी जर तुला पळून जावसं वाटलं
तर मला सागांयला बिलकूल घाबरू नकोस
मी वचन देत नाही की.....
मी तुला थांबवेनपण मीही तुझ्यासंगे येऊ शकतो

एखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेल
मला बोलव आणि.....
मी वचन देतो की…..
मी शांत राहीन

पण एखाद्या दिवशी तु बोलवलेस
आणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर.....
माझ्याकडे त्वरीत ये....
कदाचीत मलाच तुझी गरज असेल

असा चालतो शेअर बाजार !!!

 
 
एकदा एका गावात एक माणुस आला. त्याने गावकर्‍यांना सांगितले की त्याला माकडे पकडायची आहेत. प्रत्येक माकडामागे तो गावकर्‍यांना दहा रुपये देईल.
गावकरी खुश झालेत व जवळच्या जंगलात जाउन माकडे पकडायला लागलेत.
माकडे पकडायला गावकर्‍यामधे स्पर्धाच लागली. प्रत्येक जण माकडे पकडायचा व तो माणुस त्यांना माकडामागे दहा रुपये द्यायचा.
काही दिवसांनी माकडे कमी सापडू लागली तेंव्हा त्या माणसाने गावकर्‍यांना सांगीतले तो आता माकडामागे वीस रुपये देईल. गावकर्‍यांनी बाजुच्या जंगलातुन माकडे आणली व माकडामागे वीस रुपये वसुल केलेत.
काही दिवसांनी त्याने माकडामागे तीस रुपये देतो असे सांगीतले व फार थोडे माकड खरेदी केलेत कारण गावकर्‍यांना माकडे सापडेनात.
आता माकडे पन्नास रुपयाला खरेदी करतो असे सांगून तो वाट बघू लागला. गावकरी त्याला माकडे देऊ शकले नाहीत तेंव्हा तो त्यांना म्हणाला ," मी काही दिवसांत जवळच्या शहरात जाऊन येतो तो पर्यंत माकड सापडल्यास त्याच्या मदतनिसाकडे जमा करावी व तो त्यांचे पैसे देईल.
माणुस शहरात गेल्यावर त्याचा मदतनिस गावकर्‍यांना म्हणाला तुम्हाला माकडे सापडत नसल्यास तो जमा झालेले माकड पस्तीस रुपयांना गावकर्‍यांना देईल व तो माणुस शहरांतुन परत आल्यावर तेच माकडा गावकरी त्याला पन्नास रुपयांना विकू शकतात म्हणजे त्यांना पंधरा रुपयांचा फायदा होईल.
गावकर्‍यांना योजना पटली व त्यांनी शक्य तिथुन पैसे गोळा करुन पस्तीस रुपयांना माकड खरेदी केले. सर्व माकड पस्तीस रूपयांना विकुन मदतनिस शहरात गेला. त्यानंतर गावकर्‍यांना तो माणुस दिसला नाही व त्याचा मदतनिसही. पण सर्व गावात फक्त माकड दिसु लागलेत.

 

Thursday, October 16, 2008

!!!...हळवं मन...!!

बाबा, आठवतं का तुम्हाला....?

लहानपणी शाळेच्या पहिल्या दिवशी
तुम्ही अन् आई आला होतात ....
मी रडत होते शाळेत जाण्यासाठी
आईचाही जीव कळवळला होता
मला असं एकटं सोडायला .....
अशी एकमेकांपासून दूर जायची
ती पहिलीच वेळ -- तुमचीही अन् माझीही.....
पण तुम्ही निश्चल होतात...
राकट सह्यांद्रीसारखे...
आईला समजावत होते तुम्ही
"गाड़ी रुळावर आणायची आहे ना ?
धीर ठेव..अगं आपलीच कळी ती
फुलायची आहे अजून....."
आईही मग गप्प बसली
काहीतरी समजल्यासारखी.....
अन् मग घरी येऊन गप्प बसलात..
काहीतरी विचार करत...माझी बाहुली गोंजारत ...
तुम्ही शांत होतात अगदी शीतल चांदण्यासारखे
पण...आसवांचा पूर आला होता बेफाम नदीप्रमाणे
तुमचंही मन झालं होतं......हळवं,निरागस .....
अगदी...... अगदी माझ्यासारखं......

जेव्हा कोणीच नसतं....

जेव्हा कोणीच नसतं
जेव्हा कोणीच नसतं
फ़क्त ती जवळ असते आठवणीने

मन रमत भूतकालात
तिच्या आठवनिंच्या गाभार्यात

क्षणात आठवते तिची पहिली भेट
आठवत तिच हसन रागावान
अणि चोरून पाहण
सारा भूतकाल उभा राहतो वर्तमानात

का कुणास ठाऊक
कधी विचारू नाहि शकलो तिला
पण आता वाटत विचारल असत
तर बर ज़ाल असत

तिचा नकारही गोड़ आठवण
म्हणुन संभालाला असता
जेव्हा कोणी नसत त्यालाही हसतमुखाने आठवला असता

खरच वास्तवाशी सामना करताना मनाला थोडं समजवावं लागतं...
मनातले दुःख लपवून चेहऱ्यावर हसू फुलवावं लागत

Friday, September 26, 2008

असाव कुणीतरी......

असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..

असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार..

असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..

असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..

असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार..
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणा

Sunday, September 14, 2008

मला माहित होत

मला माहित होत हे असच होणार होत ,
दोन दिवसांसाठी आपलस करून सोडून जाणार होत ,
त्यासाठी तुला समजावल होत ,
तरीही तू माझ ऐकल नव्हत ,
तुझ्या विश्वासावर मी माझ घरट बांधल होत ,
पण ... पण ते घरटच उध्वस्त झाल होत ,
घरट उध्वस्त झाल्यामुले मन खुप रडत होत ,
तरीही डोळ्यांत पाणी तरळत नव्हत ,
तू सोडून गेला याच वाईट वाटत नव्हत ,
तुला नको म्हणताना तरीही तू माझ्या भावनांशी खेळला याच दू:ख मनात सलत होत ,
तुला याचा जाब विचारावा अस वाटत होत ,
पण जावुदे , माझच कुठेतरी चुकल होत ,
हो ती चुक म्हणजे ''तुझ्यासाठी '' उचललेल पाउल होत ,
कारन तू मला शेवटच्या श्वासपर्यंत साथ देन्याच वचन दिल होत ,
मला माहित होत हे असच होणार होत ,
खर तर ,,,
खुप रडतय ..खुप रडतय...रे माझ मन 

Tuesday, September 09, 2008

आपल्यालाही आवडलं असतं


रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला ,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला ,

वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं..

कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला ,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला ,

कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला ,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला ,

सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...

निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला ,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला ,

माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..
तिचे मात्र दवासारखे जपले असते..

पण जाऊ दे जमलंच नाही ..

Friday, August 22, 2008

'माणूस' होवून जगायचंय!'

'माणूस' होवून जगायचंय!'

अशक्यातली गोष्ट आहे, पण मला देहाशिवाय जगायचंय,
काही काळ 'देह' सोडून, फक्त 'मन' होवून वावरायचंय ॥ धॄ ॥

कितीजण माझं, फक्त 'बाह्यरुप' बघतात, हे मला पहायचंय,
मला खरंच कितीजण ओळखतात, हे जरा आजमवायचंय,
'ऒळख' असली नसली तरी, सर्वांशी आपुलकीनं वागायचंय,
समोरच्या प्रत्येकाशी, एक 'दॄढ' नातं जोडायचंय ॥ १ ॥

आनंदाच्या क्षणी मला, आकाशात उंच उडायचंय,
हर्ष उल्हासाच्या वातावरणात, मनसोक्त रमायचंय,
निराशेच्या वेळी, दूर कुठेतरी जाऊन, जरा एकटं रहायचंय,
दु:खाच्या प्रसंगी मात्र, अगदी मनमोकळं रडायचंय ॥ २ ॥

समोरच्या प्रत्येकाकडून, जे शिकता यॆईल, ते शिकायाचंय,
चांगले गुण स्वीकारताना, लहान-मोठ्या सर्वांना 'समान' मानायचंय,
वाईट सवयी, दोषांपासून, प्रत्येकाला 'दूर' ठेवायचंय,
प्रत्येकाचा 'आदर', आणि सर्वांवर 'प्रेम' करायचंय ॥ ३ ॥

प्रत्येकाच्या उत्कर्षाच्या आनंदात, उत्साहाने सहभागी व्हायचंय,
नैराश्याने खचलेल्या प्रत्येकाला, खंबीरपणे सावरायचंय,
या सर्वांचा मला, खरा 'मित्र' बनायचंय,
प्रत्येकाच्या मनात, 'घर' करून रहायचंय ॥ ४ ॥

कळत-नकळतं माझ्यामुळे, ज्याचं मन दुखावलं असेल,
त्या प्रत्येकाची माफी मागून, त्याचं 'मन' जिंकायचंय,
ज्यांच्या वागण्यामुळे, मला त्रास झाला असेल,
त्या सर्वांना 'माफ' करून, जवळाचा 'मित्र' बनावायचंय ॥ ५ ॥

ऎकीवात असे आहे की, जगात काहीही अशक्य नाही,
म्हणूनच हे सर्व घडेल, ही 'आशा' मी सोडलेली नाही,
जीवनात ठरविलेलं, सर्व काही मिळवायचंय,
अवघड दिसणारे प्रत्येक 'ध्येय', प्रयत्नपूर्वक गाठायचंय,
अशक्य वाटणारं सर्व, शक्य करुन दाखावायचंय,
नुसतं 'मन' होऊन जगण्यापेक्षा, 'चांगल्या' मनाचा 'माणूस' होऊन जगायचंय !!!

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात


भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं


मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

मन..!

मन..!
जगात सर्वात चंचल,वेगवान काय असं कोणी विचारलं तर उत्तर येईल...माणसाचं मन...
आपलं मन खरचं किती विचित्र असतं ना...
आता इथे तर,क्षणात कुठे जाउन पोचलेलं असतं..
त्याला ना कशाचे बंध,ना कशाचे पाश...
एखाद्या पाखरापेक्षाही जास्त स्वच्छंदी..
खरं तर ते असं असतं....


मन म्हणजे मन म्हणजे मन असतं
तुमचं आमचं कधीच सेम नसतं..!

मन कधी चंचल असतं,
कधी अस्थिर असतं
पण दुसराच्या मनात काय असतं
हे कधीच कळत नसतं..

काहि जिंकायला कमी पडले तर,
जिंकण्याचं साधनही मनच असतं
आणि काहि मिळवायचे राहिलेच
तर सांत्वनालाही मनच असतं..

मन मोठ्ठं असतं,मन अरुंदही असतं
मोठया मनात बरचं काही मावतं
अरुंद मनात मन असं कधीच नसतं
तिथे फक्त अरुंद वाटेवरून चालायच असतं

काहि गोष्टी ज्यावर बिंबतात तेही मनच असतं
तर बरेच गोष्टी सोडून देणारही मनच असतं

संस्कार ज्यावर होतात तेही मनच असतं
पर्यायाने माणसाला घडविण्याचं साधनही मनच असतं

दिलखुलास हसविणारही मनच असतं
तर डोळ्यातून अश्रू आणणारही मनच असतं

बरेच गोष्टी मनात असतात
पण सर्वच बोलायचं नसतं
बोलता येत नसतं,पण म्हणून
मनातल्या मनात कधीच रडायचं नसतं

मन व डोकं यात बरचं अंतर असतं
मनाच्या निर्णयात डोकं लावलं
की ते वेगळचं वळण घेतं

म्हणून मनातल्या गोष्टीत
डोकं जरा जपूनच वापरायचं असतं
मात्र मन अयोग्य वाटेवर नेण्यास भाग पाडू शकतं
या बाबतीत मात्र डोकं चांगलचं वापरायचं असतं

असं हे मन म्हणजे मन असतं
तुमच आमचं कधीच सेम नसतं

परंतु दोघांच मन जेव्हा जुळतं
तेव्हा मात्र ते प्रेम असतं
आणि या बाबतीत मात्र
ते तुमचं आणि आमचं अगदिच सेम असतं...

ते म्हणतात "Bloody Indians"

ते म्हणतात "Bloody Indians"
ते म्हणतात आम्हाला "Bloody Indians"
उपरेच शेवटी आम्ही त्यांच्या देशात,
शिष्टाचार त्यांचे उसने घेतले
पण भारतीय मनच जपले आम्ही त्यांच्या वेशात......

त्यांच्या संगीतात रमलो तरी
अजूनही कानात "लता"च घुमते आहे,
pizza burger च्या यांच्या संस्कृतीत
अजूनही आम्हाला पूरण पोळी जमते आहे.....

कधी हळूच मिटून डोळे
मन भारतात फिरून येते,
मुम्बईची सय आली की
डोळ्यानाही भरून येते.....

महत्त्व स्वातंत्र्याचं आम्हाला
तिथे असताना कधी कळलंच नाही,
Match जिंकल्यावर फटाके उडवण्याचे
स्वातंत्र्य आम्हाला इथे उरलच नाही.....

धोब्याचं कुत्रं होउन गेलोय
मिळाली जरी "NRI" ची उपाधी तिथे,
राबलो कितीही त्यांच्यासाठी जरी
ठरतो आम्ही "Bloody Indians"च इथे......

माझ्या राखेचा एक कण....तुझ्या हातावर.

माझ्या राखेचा एक कण....तुझ्या हातावर.
प्रेमात तुझ्या मिळाले मला जे एकटेपण
त्याचा कस् माझा विझता श्वास
शेवटच्या या वळनावर आता प्रिये
शेवटची पुन्हा तुझीच आस ......

एकदा तुझा हात हातात धरून
निशब्द उभे रहायचं आहे... उमजुन घे
नाहीतर तुझा हात तूच पकड़ स्वतः
असेल तुझाच पण माझा समजुन घे

दोन्ही हात जोडून प्रार्थना कर
म्हण देवा याचे ह्रदय चिरून टाक
असेल जर त्याची थोडी कदर तर
आजच त्याला मारून टाक

मी मेल्यावर मग अर्थिवर उभी रहा
अणि स्तब्ध नयनांनी सगळ पहा ...
आसवांना मात्र स्पष्टपणे सांग घोळ घालायचा नाही
तो मेला आहे...त्याचा हट्ट धरायचा नाही ...

आग विझल्यावर मग थोडी जवळ जा
कुठे वाचलो का मी एकदा निरखून पहा
सव्तःला सांग व्हायच ते होउन गेलं
वेड्याचं आयुष्य वेड्यातच गेलं ...

उसासा टाकुन मग कामाला लाग
शेवटच एकदा माझ्याशी वैर्यासार्ख वाग
थोडीशी राख माझी बांधून घे
जड़ झाली तर वहायला नदीवर ने

राख नादित वाहून दे ,सगळकाही संपलं असेल
जे झाल मझ्यासंग तुझ्या ध्यानातही उरल नसेल
संपलेल्या खेळTचा मग तू संपून टाक डाव
फ़क्त वहायचा आधी मडकं एकदा हृदयाला लाव

बघ... राखेचा एक कण तुझ्या हातावर राहिल
शेवटच का होईना तुझाकड़े आशेन् पहिल
त्यालाही तुझा अश्रुची चव तू कळवणार का ?
विझवून अश्रुत एकदा पुन्हा त्यास्...जळवणार का ?

Monday, August 18, 2008

उपरा

मी एकटाच होतो अन् तोच बरा आहे
उमगले दोष माझ्याच रक्तात जरा आहे
मुखवटा घालुन हसरा फिरतो जरी जगी या
उघडा पडतो कधी कधी चेहरा जो खरा आहे
ठोकराच मिळाल्या दुनियेकडुन मजला
उठुन आताशा कुठे सावरलो जरा आहे
तुझ्या आठवांचा मनात दुखरा कोपरा आहे
मुक्त मनाचाही आता बंदिस्त पिंजरा आहे
कुणी कुणाचा नसतो या जगाच्या पाठीवर
कुणा न वाटे आपला मी तो उपरा आहे

मुलांच्या चालूगिरीची काय वर्णांवी गाथा

मुलांच्या चालूगिरीची काय वर्णांवी गाथा….”
या मुलांच्या चालूगिरीची
काय वर्णांवी गाथा….
तडतडते शीर नि
ठणठणतो माथा…
बोलशील का माझ्याशी
आवडतेस मला खूप…
डोके फिरले का तुझे?
कहाँ बारिशमें निकली धूप..
तुझे नाव कोरले मनात
तूच सर्वांहून खास…
जागा हो आधी
तुझे हे निव्वळ भास…
इंप्रेशन मग पाडायला
केल्या कविता पेस्ट…
ओळखीच्याच कविता-कवी
सगळीच मेहनत वेस्ट….
थांब म्हटलं जरा
वेगळ्या आपल्या वाटा….
म्हणे तू असा नको
विषयाला देऊ फाटा….
तुझ्याशिवाय जगायचं?
जमणारच नाही मला….
न जमायला काय झालं
ओपशन्स आहेत

Monday, August 11, 2008

असं असतं का प्रेम ???

एका डॉक्‍टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय. डॉक्‍टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते. ""आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट आहे का?'' ""नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्‍ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय.'' ""हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?'' ""हो! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती.'' ""अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या? काळजीही करतील...?'' ""नाही डॉक्‍टर. तिला "अल्झायमर्स' झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.'' आजोबा शांतपणे म्हणाले. डॉक्‍टर चकित होऊन म्हणाले, ""आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्‍ता करायला इतक्‍या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखतही नसताना?'' त्यावर पुनः तितक्‍याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, ""डॉक्‍टर ती मला ओळखत नसली, तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे ती, आणि माझं जिवापाड प्रेम आहे तिच्यावर.'' ऐकता ऐकता डॉक्‍टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या मनात आलं, ""हे खरं प्रेम; प्रमे म्हणजे काही नुसतं घेणं नव्हे, तर त्याबरोबर कितीतरी देणं, निरपेक्षपणे स्वतःकडचा आनंद लुटवणं, उधळणं - त्या गृहस्थांसारखं.'' अचानक इंटरनेटवरून आलेल्या अनेक संदेशांमधला एक संदेश डॉक्‍टरांना आठवला- ""चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहेमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही - पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात.'' यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं... खरंच मिळेल असं प्रेम आपल्याला अन्‌ जमेल का असं प्रेम करणं आपल्याला?...

Sunday, August 10, 2008

माझी होशील का ???

माझी होशील का ? ..
Valentine SPECIAL ! :)
बस एकदा हो म्हणून, मज तू वरशील का
आज माझी , फ़क्त माझीच , सखये होशील का
चंद्र,सूर्य,ताऱ्यांवर नसेल माझं वर्चस्व
बाकी काही माग तू,आणेन विकून सर्वस्व
या गोड व्यवहारात माझं हृदय मागशील का
म्हणतात लोकं ,प्रेम आंधळं असतं
खरं तर ते जग या जगावेगळं असतं
माझ्या डोळ्यातून हे स्वप्नाळू जग पाहशील का
भरल्या घरात मनाची सुनी ओसरी
खुदकन हसवतात तुझी स्वप्नं बावरी
इवल्याशा या आभाळभर जागेत राहशील का
हे रेशमी केस,गालावरची अवखळ खळी
मुग्ध बडबडती जिवणी,वेड लावते मुळी
या रुपचंद्राने माझं आकाश पूर्ण करशील का
काहीही लिहतोय मी , जे सुचतंय ते
शब्द आता रागवलेत , त्यांना बोचतंय ते
शब्दांना माझ्या हसवण्यासाठी येशील का

मला तुला

जमल नाही मला, तुला विसरायला

जमल नाही तुला, आठवायला मला

कळल नाही मला, तुझ स्वार्थ जतन

कळल नाही तुला, माझ पवित्र मन

पटल नाही मला, तुझ फसवण

पटल नाही तुला, माझ केवळ प्रेम

ऐकल नाही मी, कधीच दुसर्यांच

ऐकल नाहीस तु, कधीच माझ
वळल नाही माझ, पाउल दुसरीकडे

वळल नाही तुझ, पाउल माझियाकडे

" बायकांचं जग "

कोण म्हणतो जग पुरुषांचं आहे. अहो, नीट पाहा . जग बायकांचं आहे. स्त्रीप्रधानच संस्कृती आहे आपली.त्याला वर्गात पोहोचायला उशीर झाला, तर शिव्या पडतात.तिला उशीर झाला, तर ‘ हल्ली बसेस लेटच येतायत‘ म्हणून सरच तिचं स्वागत करतात.त्यानं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर म्हणतात, ” साला लाइन मारतोय बघ!”ती त्याच्याशी बोलली, तर फक्त विशुद्ध मैत्री.ती रडली, तर ती म्हणेल ते खरे.तो रडला तर म्हणतात, पोरींसारखे रडणे शोभत नाही बरे.मुलीला अपघात झाला, तर ती इतरांची चूक.मुलाला अपघात झाला, तर ती फक्त त्याचीच चूक.मुलगा स्त्रियांसाठी राखीव जागेवर बसला, तर तो मॅनरलेस, असंस्कृत.मुलगी इतर सीट्सवर बसली, तर तिचा तो हक्कच.तिनं मुलासारखा पोशाख केला, तर तिला आधुनिक म्हणतात.त्यानं मुलीचा पोशाख केला, तर त्याला… तुम्हाला माहितीये काय म्हणतात!!!