Sunday, October 19, 2008

कमी आहे ती फक्त तुझ्या परत येण्याची


किती वेळ मी तुझी अशी वाट पहायची ?
तुझ्या आठवणीत ही सारी रात्र जागवायची, 
त्या चन्द्र चाँदन्याही मला वाट पहाताना बघतात,
तुझ्या नावाने मला पान फूल सुद्धा चिडवतात.

दिवस रात्र मी तुझाच विचार करत असते,
तू कसा आहेस? चन्द्र चाँदन्यानाच विचारत असते, 

कंटाळले आता तेहि प्रश्नांची उत्तरे द्यायला,
त्यानिही सुरुवात केली तूझी वाट पहायला.
कमी आहे ती फक्त तुझ्या परत येण्याची,

कदाचीत मलाच तुझी गरज असेल

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं
तर मला हाक मार
मी वचन तर देत नाही की.....
मी तुला हासवेन
पण मी तुझ्यासंगे रडू तर शकतो

एखाद्या दिवशी जर तुला पळून जावसं वाटलं
तर मला सागांयला बिलकूल घाबरू नकोस
मी वचन देत नाही की.....
मी तुला थांबवेनपण मीही तुझ्यासंगे येऊ शकतो

एखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेल
मला बोलव आणि.....
मी वचन देतो की…..
मी शांत राहीन

पण एखाद्या दिवशी तु बोलवलेस
आणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर.....
माझ्याकडे त्वरीत ये....
कदाचीत मलाच तुझी गरज असेल

असा चालतो शेअर बाजार !!!

 
 
एकदा एका गावात एक माणुस आला. त्याने गावकर्‍यांना सांगितले की त्याला माकडे पकडायची आहेत. प्रत्येक माकडामागे तो गावकर्‍यांना दहा रुपये देईल.
गावकरी खुश झालेत व जवळच्या जंगलात जाउन माकडे पकडायला लागलेत.
माकडे पकडायला गावकर्‍यामधे स्पर्धाच लागली. प्रत्येक जण माकडे पकडायचा व तो माणुस त्यांना माकडामागे दहा रुपये द्यायचा.
काही दिवसांनी माकडे कमी सापडू लागली तेंव्हा त्या माणसाने गावकर्‍यांना सांगीतले तो आता माकडामागे वीस रुपये देईल. गावकर्‍यांनी बाजुच्या जंगलातुन माकडे आणली व माकडामागे वीस रुपये वसुल केलेत.
काही दिवसांनी त्याने माकडामागे तीस रुपये देतो असे सांगीतले व फार थोडे माकड खरेदी केलेत कारण गावकर्‍यांना माकडे सापडेनात.
आता माकडे पन्नास रुपयाला खरेदी करतो असे सांगून तो वाट बघू लागला. गावकरी त्याला माकडे देऊ शकले नाहीत तेंव्हा तो त्यांना म्हणाला ," मी काही दिवसांत जवळच्या शहरात जाऊन येतो तो पर्यंत माकड सापडल्यास त्याच्या मदतनिसाकडे जमा करावी व तो त्यांचे पैसे देईल.
माणुस शहरात गेल्यावर त्याचा मदतनिस गावकर्‍यांना म्हणाला तुम्हाला माकडे सापडत नसल्यास तो जमा झालेले माकड पस्तीस रुपयांना गावकर्‍यांना देईल व तो माणुस शहरांतुन परत आल्यावर तेच माकडा गावकरी त्याला पन्नास रुपयांना विकू शकतात म्हणजे त्यांना पंधरा रुपयांचा फायदा होईल.
गावकर्‍यांना योजना पटली व त्यांनी शक्य तिथुन पैसे गोळा करुन पस्तीस रुपयांना माकड खरेदी केले. सर्व माकड पस्तीस रूपयांना विकुन मदतनिस शहरात गेला. त्यानंतर गावकर्‍यांना तो माणुस दिसला नाही व त्याचा मदतनिसही. पण सर्व गावात फक्त माकड दिसु लागलेत.

 

Thursday, October 16, 2008

!!!...हळवं मन...!!

बाबा, आठवतं का तुम्हाला....?

लहानपणी शाळेच्या पहिल्या दिवशी
तुम्ही अन् आई आला होतात ....
मी रडत होते शाळेत जाण्यासाठी
आईचाही जीव कळवळला होता
मला असं एकटं सोडायला .....
अशी एकमेकांपासून दूर जायची
ती पहिलीच वेळ -- तुमचीही अन् माझीही.....
पण तुम्ही निश्चल होतात...
राकट सह्यांद्रीसारखे...
आईला समजावत होते तुम्ही
"गाड़ी रुळावर आणायची आहे ना ?
धीर ठेव..अगं आपलीच कळी ती
फुलायची आहे अजून....."
आईही मग गप्प बसली
काहीतरी समजल्यासारखी.....
अन् मग घरी येऊन गप्प बसलात..
काहीतरी विचार करत...माझी बाहुली गोंजारत ...
तुम्ही शांत होतात अगदी शीतल चांदण्यासारखे
पण...आसवांचा पूर आला होता बेफाम नदीप्रमाणे
तुमचंही मन झालं होतं......हळवं,निरागस .....
अगदी...... अगदी माझ्यासारखं......

जेव्हा कोणीच नसतं....

जेव्हा कोणीच नसतं
जेव्हा कोणीच नसतं
फ़क्त ती जवळ असते आठवणीने

मन रमत भूतकालात
तिच्या आठवनिंच्या गाभार्यात

क्षणात आठवते तिची पहिली भेट
आठवत तिच हसन रागावान
अणि चोरून पाहण
सारा भूतकाल उभा राहतो वर्तमानात

का कुणास ठाऊक
कधी विचारू नाहि शकलो तिला
पण आता वाटत विचारल असत
तर बर ज़ाल असत

तिचा नकारही गोड़ आठवण
म्हणुन संभालाला असता
जेव्हा कोणी नसत त्यालाही हसतमुखाने आठवला असता

खरच वास्तवाशी सामना करताना मनाला थोडं समजवावं लागतं...
मनातले दुःख लपवून चेहऱ्यावर हसू फुलवावं लागत