'माणूस' होवून जगायचंय!'
अशक्यातली गोष्ट आहे, पण मला देहाशिवाय जगायचंय,
काही काळ 'देह' सोडून, फक्त 'मन' होवून वावरायचंय ॥ धॄ ॥
कितीजण माझं, फक्त 'बाह्यरुप' बघतात, हे मला पहायचंय,
मला खरंच कितीजण ओळखतात, हे जरा आजमवायचंय,
'ऒळख' असली नसली तरी, सर्वांशी आपुलकीनं वागायचंय,
समोरच्या प्रत्येकाशी, एक 'दॄढ' नातं जोडायचंय ॥ १ ॥
आनंदाच्या क्षणी मला, आकाशात उंच उडायचंय,
हर्ष उल्हासाच्या वातावरणात, मनसोक्त रमायचंय,
निराशेच्या वेळी, दूर कुठेतरी जाऊन, जरा एकटं रहायचंय,
दु:खाच्या प्रसंगी मात्र, अगदी मनमोकळं रडायचंय ॥ २ ॥
समोरच्या प्रत्येकाकडून, जे शिकता यॆईल, ते शिकायाचंय,
चांगले गुण स्वीकारताना, लहान-मोठ्या सर्वांना 'समान' मानायचंय,
वाईट सवयी, दोषांपासून, प्रत्येकाला 'दूर' ठेवायचंय,
प्रत्येकाचा 'आदर', आणि सर्वांवर 'प्रेम' करायचंय ॥ ३ ॥
प्रत्येकाच्या उत्कर्षाच्या आनंदात, उत्साहाने सहभागी व्हायचंय,
नैराश्याने खचलेल्या प्रत्येकाला, खंबीरपणे सावरायचंय,
या सर्वांचा मला, खरा 'मित्र' बनायचंय,
प्रत्येकाच्या मनात, 'घर' करून रहायचंय ॥ ४ ॥
कळत-नकळतं माझ्यामुळे, ज्याचं मन दुखावलं असेल,
त्या प्रत्येकाची माफी मागून, त्याचं 'मन' जिंकायचंय,
ज्यांच्या वागण्यामुळे, मला त्रास झाला असेल,
त्या सर्वांना 'माफ' करून, जवळाचा 'मित्र' बनावायचंय ॥ ५ ॥
ऎकीवात असे आहे की, जगात काहीही अशक्य नाही,
म्हणूनच हे सर्व घडेल, ही 'आशा' मी सोडलेली नाही,
जीवनात ठरविलेलं, सर्व काही मिळवायचंय,
अवघड दिसणारे प्रत्येक 'ध्येय', प्रयत्नपूर्वक गाठायचंय,
अशक्य वाटणारं सर्व, शक्य करुन दाखावायचंय,
नुसतं 'मन' होऊन जगण्यापेक्षा, 'चांगल्या' मनाचा 'माणूस' होऊन जगायचंय !!!
Friday, August 22, 2008
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...
माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...
मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं
अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...
माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...
मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं
अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
मन..!
मन..!
जगात सर्वात चंचल,वेगवान काय असं कोणी विचारलं तर उत्तर येईल...माणसाचं मन...
आपलं मन खरचं किती विचित्र असतं ना...
आता इथे तर,क्षणात कुठे जाउन पोचलेलं असतं..
त्याला ना कशाचे बंध,ना कशाचे पाश...
एखाद्या पाखरापेक्षाही जास्त स्वच्छंदी..
खरं तर ते असं असतं....
मन म्हणजे मन म्हणजे मन असतं
तुमचं आमचं कधीच सेम नसतं..!
मन कधी चंचल असतं,
कधी अस्थिर असतं
पण दुसराच्या मनात काय असतं
हे कधीच कळत नसतं..
काहि जिंकायला कमी पडले तर,
जिंकण्याचं साधनही मनच असतं
आणि काहि मिळवायचे राहिलेच
तर सांत्वनालाही मनच असतं..
मन मोठ्ठं असतं,मन अरुंदही असतं
मोठया मनात बरचं काही मावतं
अरुंद मनात मन असं कधीच नसतं
तिथे फक्त अरुंद वाटेवरून चालायच असतं
काहि गोष्टी ज्यावर बिंबतात तेही मनच असतं
तर बरेच गोष्टी सोडून देणारही मनच असतं
संस्कार ज्यावर होतात तेही मनच असतं
पर्यायाने माणसाला घडविण्याचं साधनही मनच असतं
दिलखुलास हसविणारही मनच असतं
तर डोळ्यातून अश्रू आणणारही मनच असतं
बरेच गोष्टी मनात असतात
पण सर्वच बोलायचं नसतं
बोलता येत नसतं,पण म्हणून
मनातल्या मनात कधीच रडायचं नसतं
मन व डोकं यात बरचं अंतर असतं
मनाच्या निर्णयात डोकं लावलं
की ते वेगळचं वळण घेतं
म्हणून मनातल्या गोष्टीत
डोकं जरा जपूनच वापरायचं असतं
मात्र मन अयोग्य वाटेवर नेण्यास भाग पाडू शकतं
या बाबतीत मात्र डोकं चांगलचं वापरायचं असतं
असं हे मन म्हणजे मन असतं
तुमच आमचं कधीच सेम नसतं
परंतु दोघांच मन जेव्हा जुळतं
तेव्हा मात्र ते प्रेम असतं
आणि या बाबतीत मात्र
ते तुमचं आणि आमचं अगदिच सेम असतं...
जगात सर्वात चंचल,वेगवान काय असं कोणी विचारलं तर उत्तर येईल...माणसाचं मन...
आपलं मन खरचं किती विचित्र असतं ना...
आता इथे तर,क्षणात कुठे जाउन पोचलेलं असतं..
त्याला ना कशाचे बंध,ना कशाचे पाश...
एखाद्या पाखरापेक्षाही जास्त स्वच्छंदी..
खरं तर ते असं असतं....
मन म्हणजे मन म्हणजे मन असतं
तुमचं आमचं कधीच सेम नसतं..!
मन कधी चंचल असतं,
कधी अस्थिर असतं
पण दुसराच्या मनात काय असतं
हे कधीच कळत नसतं..
काहि जिंकायला कमी पडले तर,
जिंकण्याचं साधनही मनच असतं
आणि काहि मिळवायचे राहिलेच
तर सांत्वनालाही मनच असतं..
मन मोठ्ठं असतं,मन अरुंदही असतं
मोठया मनात बरचं काही मावतं
अरुंद मनात मन असं कधीच नसतं
तिथे फक्त अरुंद वाटेवरून चालायच असतं
काहि गोष्टी ज्यावर बिंबतात तेही मनच असतं
तर बरेच गोष्टी सोडून देणारही मनच असतं
संस्कार ज्यावर होतात तेही मनच असतं
पर्यायाने माणसाला घडविण्याचं साधनही मनच असतं
दिलखुलास हसविणारही मनच असतं
तर डोळ्यातून अश्रू आणणारही मनच असतं
बरेच गोष्टी मनात असतात
पण सर्वच बोलायचं नसतं
बोलता येत नसतं,पण म्हणून
मनातल्या मनात कधीच रडायचं नसतं
मन व डोकं यात बरचं अंतर असतं
मनाच्या निर्णयात डोकं लावलं
की ते वेगळचं वळण घेतं
म्हणून मनातल्या गोष्टीत
डोकं जरा जपूनच वापरायचं असतं
मात्र मन अयोग्य वाटेवर नेण्यास भाग पाडू शकतं
या बाबतीत मात्र डोकं चांगलचं वापरायचं असतं
असं हे मन म्हणजे मन असतं
तुमच आमचं कधीच सेम नसतं
परंतु दोघांच मन जेव्हा जुळतं
तेव्हा मात्र ते प्रेम असतं
आणि या बाबतीत मात्र
ते तुमचं आणि आमचं अगदिच सेम असतं...
ते म्हणतात "Bloody Indians"
ते म्हणतात "Bloody Indians"
ते म्हणतात आम्हाला "Bloody Indians"
उपरेच शेवटी आम्ही त्यांच्या देशात,
शिष्टाचार त्यांचे उसने घेतले
पण भारतीय मनच जपले आम्ही त्यांच्या वेशात......
त्यांच्या संगीतात रमलो तरी
अजूनही कानात "लता"च घुमते आहे,
pizza burger च्या यांच्या संस्कृतीत
अजूनही आम्हाला पूरण पोळी जमते आहे.....
कधी हळूच मिटून डोळे
मन भारतात फिरून येते,
मुम्बईची सय आली की
डोळ्यानाही भरून येते.....
महत्त्व स्वातंत्र्याचं आम्हाला
तिथे असताना कधी कळलंच नाही,
Match जिंकल्यावर फटाके उडवण्याचे
स्वातंत्र्य आम्हाला इथे उरलच नाही.....
धोब्याचं कुत्रं होउन गेलोय
मिळाली जरी "NRI" ची उपाधी तिथे,
राबलो कितीही त्यांच्यासाठी जरी
ठरतो आम्ही "Bloody Indians"च इथे......
ते म्हणतात आम्हाला "Bloody Indians"
उपरेच शेवटी आम्ही त्यांच्या देशात,
शिष्टाचार त्यांचे उसने घेतले
पण भारतीय मनच जपले आम्ही त्यांच्या वेशात......
त्यांच्या संगीतात रमलो तरी
अजूनही कानात "लता"च घुमते आहे,
pizza burger च्या यांच्या संस्कृतीत
अजूनही आम्हाला पूरण पोळी जमते आहे.....
कधी हळूच मिटून डोळे
मन भारतात फिरून येते,
मुम्बईची सय आली की
डोळ्यानाही भरून येते.....
महत्त्व स्वातंत्र्याचं आम्हाला
तिथे असताना कधी कळलंच नाही,
Match जिंकल्यावर फटाके उडवण्याचे
स्वातंत्र्य आम्हाला इथे उरलच नाही.....
धोब्याचं कुत्रं होउन गेलोय
मिळाली जरी "NRI" ची उपाधी तिथे,
राबलो कितीही त्यांच्यासाठी जरी
ठरतो आम्ही "Bloody Indians"च इथे......
माझ्या राखेचा एक कण....तुझ्या हातावर.
माझ्या राखेचा एक कण....तुझ्या हातावर.
प्रेमात तुझ्या मिळाले मला जे एकटेपण
त्याचा कस् माझा विझता श्वास
शेवटच्या या वळनावर आता प्रिये
शेवटची पुन्हा तुझीच आस ......
एकदा तुझा हात हातात धरून
निशब्द उभे रहायचं आहे... उमजुन घे
नाहीतर तुझा हात तूच पकड़ स्वतः
असेल तुझाच पण माझा समजुन घे
दोन्ही हात जोडून प्रार्थना कर
म्हण देवा याचे ह्रदय चिरून टाक
असेल जर त्याची थोडी कदर तर
आजच त्याला मारून टाक
मी मेल्यावर मग अर्थिवर उभी रहा
अणि स्तब्ध नयनांनी सगळ पहा ...
आसवांना मात्र स्पष्टपणे सांग घोळ घालायचा नाही
तो मेला आहे...त्याचा हट्ट धरायचा नाही ...
आग विझल्यावर मग थोडी जवळ जा
कुठे वाचलो का मी एकदा निरखून पहा
सव्तःला सांग व्हायच ते होउन गेलं
वेड्याचं आयुष्य वेड्यातच गेलं ...
उसासा टाकुन मग कामाला लाग
शेवटच एकदा माझ्याशी वैर्यासार्ख वाग
थोडीशी राख माझी बांधून घे
जड़ झाली तर वहायला नदीवर ने
राख नादित वाहून दे ,सगळकाही संपलं असेल
जे झाल मझ्यासंग तुझ्या ध्यानातही उरल नसेल
संपलेल्या खेळTचा मग तू संपून टाक डाव
फ़क्त वहायचा आधी मडकं एकदा हृदयाला लाव
बघ... राखेचा एक कण तुझ्या हातावर राहिल
शेवटच का होईना तुझाकड़े आशेन् पहिल
त्यालाही तुझा अश्रुची चव तू कळवणार का ?
विझवून अश्रुत एकदा पुन्हा त्यास्...जळवणार का ?
प्रेमात तुझ्या मिळाले मला जे एकटेपण
त्याचा कस् माझा विझता श्वास
शेवटच्या या वळनावर आता प्रिये
शेवटची पुन्हा तुझीच आस ......
एकदा तुझा हात हातात धरून
निशब्द उभे रहायचं आहे... उमजुन घे
नाहीतर तुझा हात तूच पकड़ स्वतः
असेल तुझाच पण माझा समजुन घे
दोन्ही हात जोडून प्रार्थना कर
म्हण देवा याचे ह्रदय चिरून टाक
असेल जर त्याची थोडी कदर तर
आजच त्याला मारून टाक
मी मेल्यावर मग अर्थिवर उभी रहा
अणि स्तब्ध नयनांनी सगळ पहा ...
आसवांना मात्र स्पष्टपणे सांग घोळ घालायचा नाही
तो मेला आहे...त्याचा हट्ट धरायचा नाही ...
आग विझल्यावर मग थोडी जवळ जा
कुठे वाचलो का मी एकदा निरखून पहा
सव्तःला सांग व्हायच ते होउन गेलं
वेड्याचं आयुष्य वेड्यातच गेलं ...
उसासा टाकुन मग कामाला लाग
शेवटच एकदा माझ्याशी वैर्यासार्ख वाग
थोडीशी राख माझी बांधून घे
जड़ झाली तर वहायला नदीवर ने
राख नादित वाहून दे ,सगळकाही संपलं असेल
जे झाल मझ्यासंग तुझ्या ध्यानातही उरल नसेल
संपलेल्या खेळTचा मग तू संपून टाक डाव
फ़क्त वहायचा आधी मडकं एकदा हृदयाला लाव
बघ... राखेचा एक कण तुझ्या हातावर राहिल
शेवटच का होईना तुझाकड़े आशेन् पहिल
त्यालाही तुझा अश्रुची चव तू कळवणार का ?
विझवून अश्रुत एकदा पुन्हा त्यास्...जळवणार का ?
Monday, August 18, 2008
उपरा
मी एकटाच होतो अन् तोच बरा आहे
उमगले दोष माझ्याच रक्तात जरा आहे
मुखवटा घालुन हसरा फिरतो जरी जगी या
उघडा पडतो कधी कधी चेहरा जो खरा आहे
ठोकराच मिळाल्या दुनियेकडुन मजला
उठुन आताशा कुठे सावरलो जरा आहे
तुझ्या आठवांचा मनात दुखरा कोपरा आहे
मुक्त मनाचाही आता बंदिस्त पिंजरा आहे
कुणी कुणाचा नसतो या जगाच्या पाठीवर
कुणा न वाटे आपला मी तो उपरा आहे
उमगले दोष माझ्याच रक्तात जरा आहे
मुखवटा घालुन हसरा फिरतो जरी जगी या
उघडा पडतो कधी कधी चेहरा जो खरा आहे
ठोकराच मिळाल्या दुनियेकडुन मजला
उठुन आताशा कुठे सावरलो जरा आहे
तुझ्या आठवांचा मनात दुखरा कोपरा आहे
मुक्त मनाचाही आता बंदिस्त पिंजरा आहे
कुणी कुणाचा नसतो या जगाच्या पाठीवर
कुणा न वाटे आपला मी तो उपरा आहे
मुलांच्या चालूगिरीची काय वर्णांवी गाथा
मुलांच्या चालूगिरीची काय वर्णांवी गाथा….”
या मुलांच्या चालूगिरीची
काय वर्णांवी गाथा….
तडतडते शीर नि
ठणठणतो माथा…
बोलशील का माझ्याशी
आवडतेस मला खूप…
डोके फिरले का तुझे?
कहाँ बारिशमें निकली धूप..
तुझे नाव कोरले मनात
तूच सर्वांहून खास…
जागा हो आधी
तुझे हे निव्वळ भास…
इंप्रेशन मग पाडायला
केल्या कविता पेस्ट…
ओळखीच्याच कविता-कवी
सगळीच मेहनत वेस्ट….
थांब म्हटलं जरा
वेगळ्या आपल्या वाटा….
म्हणे तू असा नको
विषयाला देऊ फाटा….
तुझ्याशिवाय जगायचं?
जमणारच नाही मला….
न जमायला काय झालं
ओपशन्स आहेत
या मुलांच्या चालूगिरीची
काय वर्णांवी गाथा….
तडतडते शीर नि
ठणठणतो माथा…
बोलशील का माझ्याशी
आवडतेस मला खूप…
डोके फिरले का तुझे?
कहाँ बारिशमें निकली धूप..
तुझे नाव कोरले मनात
तूच सर्वांहून खास…
जागा हो आधी
तुझे हे निव्वळ भास…
इंप्रेशन मग पाडायला
केल्या कविता पेस्ट…
ओळखीच्याच कविता-कवी
सगळीच मेहनत वेस्ट….
थांब म्हटलं जरा
वेगळ्या आपल्या वाटा….
म्हणे तू असा नको
विषयाला देऊ फाटा….
तुझ्याशिवाय जगायचं?
जमणारच नाही मला….
न जमायला काय झालं
ओपशन्स आहेत
Monday, August 11, 2008
असं असतं का प्रेम ???
एका डॉक्टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय. डॉक्टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते. ""आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे का?'' ""नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय.'' ""हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?'' ""हो! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती.'' ""अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या? काळजीही करतील...?'' ""नाही डॉक्टर. तिला "अल्झायमर्स' झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.'' आजोबा शांतपणे म्हणाले. डॉक्टर चकित होऊन म्हणाले, ""आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्ता करायला इतक्या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखतही नसताना?'' त्यावर पुनः तितक्याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, ""डॉक्टर ती मला ओळखत नसली, तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे ती, आणि माझं जिवापाड प्रेम आहे तिच्यावर.'' ऐकता ऐकता डॉक्टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या मनात आलं, ""हे खरं प्रेम; प्रमे म्हणजे काही नुसतं घेणं नव्हे, तर त्याबरोबर कितीतरी देणं, निरपेक्षपणे स्वतःकडचा आनंद लुटवणं, उधळणं - त्या गृहस्थांसारखं.'' अचानक इंटरनेटवरून आलेल्या अनेक संदेशांमधला एक संदेश डॉक्टरांना आठवला- ""चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहेमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही - पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात.'' यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं... खरंच मिळेल असं प्रेम आपल्याला अन् जमेल का असं प्रेम करणं आपल्याला?...
Sunday, August 10, 2008
माझी होशील का ???
माझी होशील का ? ..
Valentine SPECIAL ! :)
बस एकदा हो म्हणून, मज तू वरशील का
बस एकदा हो म्हणून, मज तू वरशील का
आज माझी , फ़क्त माझीच , सखये होशील का
चंद्र,सूर्य,ताऱ्यांवर नसेल माझं वर्चस्व
बाकी काही माग तू,आणेन विकून सर्वस्व
या गोड व्यवहारात माझं हृदय मागशील का
म्हणतात लोकं ,प्रेम आंधळं असतं
खरं तर ते जग या जगावेगळं असतं
माझ्या डोळ्यातून हे स्वप्नाळू जग पाहशील का
भरल्या घरात मनाची सुनी ओसरी
खुदकन हसवतात तुझी स्वप्नं बावरी
इवल्याशा या आभाळभर जागेत राहशील का
हे रेशमी केस,गालावरची अवखळ खळी
मुग्ध बडबडती जिवणी,वेड लावते मुळी
या रुपचंद्राने माझं आकाश पूर्ण करशील का
काहीही लिहतोय मी , जे सुचतंय ते
शब्द आता रागवलेत , त्यांना बोचतंय ते
शब्दांना माझ्या हसवण्यासाठी येशील का
मला तुला
जमल नाही मला, तुला विसरायला
जमल नाही तुला, आठवायला मला
कळल नाही मला, तुझ स्वार्थ जतन
कळल नाही तुला, माझ पवित्र मन
पटल नाही मला, तुझ फसवण
पटल नाही तुला, माझ केवळ प्रेम
ऐकल नाही मी, कधीच दुसर्यांच
ऐकल नाहीस तु, कधीच माझ
वळल नाही माझ, पाउल दुसरीकडे
वळल नाही तुझ, पाउल माझियाकडे
" बायकांचं जग "
कोण म्हणतो जग पुरुषांचं आहे. अहो, नीट पाहा . जग बायकांचं आहे. स्त्रीप्रधानच संस्कृती आहे आपली.त्याला वर्गात पोहोचायला उशीर झाला, तर शिव्या पडतात.तिला उशीर झाला, तर ‘ हल्ली बसेस लेटच येतायत‘ म्हणून सरच तिचं स्वागत करतात.त्यानं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर म्हणतात, ” साला लाइन मारतोय बघ!”ती त्याच्याशी बोलली, तर फक्त विशुद्ध मैत्री.ती रडली, तर ती म्हणेल ते खरे.तो रडला तर म्हणतात, पोरींसारखे रडणे शोभत नाही बरे.मुलीला अपघात झाला, तर ती इतरांची चूक.मुलाला अपघात झाला, तर ती फक्त त्याचीच चूक.मुलगा स्त्रियांसाठी राखीव जागेवर बसला, तर तो मॅनरलेस, असंस्कृत.मुलगी इतर सीट्सवर बसली, तर तिचा तो हक्कच.तिनं मुलासारखा पोशाख केला, तर तिला आधुनिक म्हणतात.त्यानं मुलीचा पोशाख केला, तर त्याला… तुम्हाला माहितीये काय म्हणतात!!!
Subscribe to:
Posts (Atom)